शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’बाबत नेत्याकडून हीन दर्जाचे राजकारण : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:08 IST

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात चुकीची परंपरा पाडू नका

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते. अशाप्रकारच्या राजकारणाची सांगलीची परंपरा नाही, असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ते म्हणाले की, माझ्या प्रयत्नावेळी जिल्ह्यातील भाजपसहीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या आमदारांनीही योजना सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. आ. सुमनताई पाटीलही या प्रयत्नांना पाठबळ देत होत्या. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे यात राजकारण आणणे चुकीचे होते, मात्र एका राजकीय नेत्याने माझे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत म्हणून प्रयत्न चालविले होते. त्यांची ही कृष्णकृत्ये अखेर माझ्यासमोर आली. वास्तविक इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच सांगली जिल्ह्यात झाले नव्हते. आम्हीसुद्धा राजकारणात असल्या गोष्टी कधीच केल्या नाहीत. चुकीची परंपरा कोणीतरी पाडू पहात आहे. परंपरेला हा डाग आहे. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.ते म्हणाले की, म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मदत केली. एकवेळ माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता, मात्र माझी नाराजी पक्ष किंवा कोणत्या नेत्यावर नव्हती. जलदगतीने निर्णय होत नव्हता म्हणून माझी नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. सध्यस्थितीत कोणतीही नाराजी नाही. योजनेच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढे शेतकºयांना अत्यंत माफक दरातील बिल भरणे सहज शक्य होईल. त्यामुळे शासनाचा निर्णयावर मी समाधानी आहे.राजीनाम्यामागे राजकारण नव्हते!ज्या जनतेने मला निवडून दिले, त्यांच्यासाठी माझे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर, पदावर रहायचे कशाला, असा विचार करून नाराजीतून राजीनामा दिला होता. मात्र यामागे माझे कोणतेही राजकारण नव्हते. स्टंटबाजी करून मोठे व्हायचे नाही. लोकांसाठी काही तरी भरीव कार्य करायचे आहे, असे संजयकाका म्हणाले.नेता कोण?योजना बंद रहावी म्हणून प्रयत्न करणारा तो नेता कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर संजयकाका पाटील म्हणाले की, त्या गोष्टीतून पुन्हा राजकारण होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे कोणाचे नाव घेणार नाही. संजयकाकांचा निशाणा पक्षातीलच एका नेत्यावर असावा, अशी चर्चा आता रंगली आहे.