शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘म्हैसाळ’बाबत नेत्याकडून हीन दर्जाचे राजकारण : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:08 IST

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात चुकीची परंपरा पाडू नका

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते. अशाप्रकारच्या राजकारणाची सांगलीची परंपरा नाही, असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ते म्हणाले की, माझ्या प्रयत्नावेळी जिल्ह्यातील भाजपसहीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या आमदारांनीही योजना सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. आ. सुमनताई पाटीलही या प्रयत्नांना पाठबळ देत होत्या. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे यात राजकारण आणणे चुकीचे होते, मात्र एका राजकीय नेत्याने माझे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत म्हणून प्रयत्न चालविले होते. त्यांची ही कृष्णकृत्ये अखेर माझ्यासमोर आली. वास्तविक इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच सांगली जिल्ह्यात झाले नव्हते. आम्हीसुद्धा राजकारणात असल्या गोष्टी कधीच केल्या नाहीत. चुकीची परंपरा कोणीतरी पाडू पहात आहे. परंपरेला हा डाग आहे. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.ते म्हणाले की, म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मदत केली. एकवेळ माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता, मात्र माझी नाराजी पक्ष किंवा कोणत्या नेत्यावर नव्हती. जलदगतीने निर्णय होत नव्हता म्हणून माझी नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. सध्यस्थितीत कोणतीही नाराजी नाही. योजनेच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढे शेतकºयांना अत्यंत माफक दरातील बिल भरणे सहज शक्य होईल. त्यामुळे शासनाचा निर्णयावर मी समाधानी आहे.राजीनाम्यामागे राजकारण नव्हते!ज्या जनतेने मला निवडून दिले, त्यांच्यासाठी माझे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर, पदावर रहायचे कशाला, असा विचार करून नाराजीतून राजीनामा दिला होता. मात्र यामागे माझे कोणतेही राजकारण नव्हते. स्टंटबाजी करून मोठे व्हायचे नाही. लोकांसाठी काही तरी भरीव कार्य करायचे आहे, असे संजयकाका म्हणाले.नेता कोण?योजना बंद रहावी म्हणून प्रयत्न करणारा तो नेता कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर संजयकाका पाटील म्हणाले की, त्या गोष्टीतून पुन्हा राजकारण होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे कोणाचे नाव घेणार नाही. संजयकाकांचा निशाणा पक्षातीलच एका नेत्यावर असावा, अशी चर्चा आता रंगली आहे.